जागतिक बँकेचा आशावाद; १५ वर्षांत जगाचा दारिद्र्याला रामराम

world-bank
अंकारा : जगातील दारिद्र्य येत्या पंधरा वर्षांत दूर होईल, पण त्यासाठी अनेक देशांना कठोर सुधारणा करणारे निर्णय घेऊन आर्थिक विकास घडवून आणावा लागेल, असे जागतिक बँकेच्या गटाने घाना येथील भेटीत म्हटले आहे.

जागतिक बँकेच्या गटाचे जिम योंग किम यांनी सांगितले की, देशांनी लोकांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. नागरिक पुन्हा दारिद्र्यात जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. घानाची राजधानी अकरा येथे जागतिक दारिद्र्यनिर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक बँकेला लोकांचे जीवनमान सुधारायचे आहे. २०३० पर्यंत दारिद्र्याचे उच्चाटन व विकसनशील देशातील तळागाळातील ४० टक्के लोकांची भरभराट झाली पाहिजे ही आमची उद्दिष्टे आहेत. पण २०३० पर्यंत दारिद्र्य जर नष्ट करायचे असेल तर ते कठीण आव्हान आहे कारण जागतिक आर्थिक वाढ कमी आहे. वस्तूंच्या किंमती कमी आहेत व व्याजदर जास्त आहेत. आशेचा किरण म्हणजे यावर्षी दिवसाला १.९० डॉलर्स कमावणा-या लोकांची संख्या १० टक्कांपेक्षा कमी होऊन ९.६ टक्के असेल.

Leave a Comment