७ सप्टेंबरपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याला मुदतवाढ

income-tax
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सात सप्टेंबरपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याला मुदतवाढ दिल्यामुळे अद्याप प्राप्तिकर विवरणपत्र न भरलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी ३१ जुलैपर्यंत प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची मुदत असते. मात्र यावेळी केंद्र सरकारने त्यामध्ये अगोदरच ३१ ऑगस्टपर्यंत वाढ केली होती. मात्र ३१ ऑगस्टपर्यंत अनेकानी प्राप्तिकर विवरणपत्र न भरल्याने आणखी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. करदाते आता या कालावधीपर्यंत ऑनलाईन विवरणपत्र भरू शकणार आहेत.