डिसेंबरमध्ये फुटणार रिलायन्सच्या ४ जी सेवेचा नारळ

reliance
नवी दिल्ली- डिसेंबरमध्ये रिलायन्सच्या ४ जी सेवेचा शुभारंभ होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. १००० पेक्षा जास्त जिओ केंद्रामधून ही सेवा देशभरामध्ये पुरविण्यात येणार आहे.

यासोबतच या जिओ सेंटर्समधून कंपनी रिलायन्सचे हॅंडसेटही विकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांनी या प्रकल्पामध्ये आतापर्यंत १५ अब्ज डॉलर गुंतवले आहेत. येत्या काही आठवड्यामध्ये ४ जी सेवेची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात येणार आहे. रिलायन्स कंपनीतर्फे ४ जी साठी एलटीई स्मार्टफोनचा पर्याय देण्यात येणार आहे. जिओ सेंटर्स व्यतिरिक्त देशभरात ५,००,००० आउटलेट असणार आहेत. ४ जी सुविधा असणारे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध राहावेत यासाठी रिलायन्स अॅपल, शिओमी, सॅमसंग या कंपन्यांच्या संपर्कात आहे.