उत्तर कर्नाटक – येथील सिरसी तालुक्यामध्ये शाल्मला नदीमध्ये पाणी आटल्याने नदीच्या पात्रामध्ये असणारी शिवलिंगे दिसू लागली आहेत. या भागाचे वैशिष्ठ्य म्हणजे नदीच्या पात्रामध्ये संपूर्णपणे शिवलिंगे आहेत. त्यामध्ये पायही ठेवायला जागा नाही एवढी शिवलिंगे विखुरली आहेत. त्यामुळेच त्याला सहस्रशिवलिंग स्थान असे संबोधण्यात येते. सरवसाधारणपणे उन्हाळ्यात या नदीचे पाणी कमी झाल्यावर ही शिवलिंगे नदीपात्रामध्ये दिसू लागतात. हे मनोहारी दृष्य अलौकिक असेच असते.