सदाभाऊ यांनी केला शेतक-यांच्या फसवणूकीचा आरोप

sadabhau-lhot
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी भाजप सरकारकडून शेतक-यांची फसवणूक झाल्याचा आरोप केला असून सरकारने अवकाळी पाऊस आणि गारपिठग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत अजूनही शेतक-यांपर्यंत पोहचली नसल्याचेही त्यांनी सांगितले. महायुतीत राहायचे की नाही याचा ही निर्णय पुढच्या महिन्यापासून शेतक-यांच्या भावना जाणून घेऊन घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचीही तीच भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रीमंडळ विस्तारात समावेश झाला नसल्याने महायुतीतील मित्रपक्षा प्रचंड नाराज आहेत. त्यातच हे सरकार शेतक-यांनाही फसवीत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीठग्रस्तांना मदत जाहीर केली पण प्रत्यक्षात ती अजूनही मिळाली नसल्याचा आरोप खोत यांनी केला आहे. शेतक-यांची अशी फसवणूक होणार असेल तर आंदोलनाच्या तयारीत स्वाभिमानी शेतकरी संघटना असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय ऊसाला चांगला भाव मिळालाच पाहिजे ही मागणी कायम असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही प्रश्नांवर शेतक-यांची मते जाणून घेऊन पुढील भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment