रणजी सामन्यात युवराजची धडाकेबाज कामगिरी

yuvraj
नवी दिल्ली : टीम इंडियात विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी स्थान न मिळालेल्या षटकारचा बादशाह युवराज सिंहने रणजी सामन्यात धडाकेबाज कामगिरी केली असून रणजी सामन्यांमध्ये युवराज सिंहने लागोपाठ तीन शतके ठोकली आहेत. युवराजचे प्रत्येक शतक हे निवड समितीला विचार करायला लावणारे आहे.

पंजाबकडून खेळताना युवराजने सौराष्ट्रविरोधात १८२ धावांची धडाकेबाज खेळी केली. यामध्ये त्याने २३ चौकार आणि दोन षटकार लगावले आहेत. या सामन्यातील शतकासह युवराज या सत्रातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. गेल्या पाच डावात युवराजने ५९,१३०,१३६,१३ आणि १८२ धावा केल्यामुळे या सिझनमध्ये युवराज ५२० धावांसह आघाडीवर आहे. युवराजच्या या शतकाच्या जोरावर पंजाबने सौराष्ट्रविरोधात ६०० पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारला आहे.

Leave a Comment