नागपूर – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर आरोपींविरुद्धचा २३ वर्षे जुन्या वादासंदर्भातील फौजदारी खटला रद्द केला असून फडणवीस यांच्यासह हृदयकुमार बाबुलाल पराते (गिरीपेठ), मदनलाल बाबूलाल पराते (गिरीपेठ), प्रवीण रोमाधारी दुबे (काचीपुरा), दीपक जयसिंग हिरणवार (धरमपेठ), विनीत बाबूलाल पराते (गिरीपेठ) व दीपेश मदनलाल पराते (गिरीपेठ) यांचा या खटल्यात समावेश होता. ७ जून १९९१ रोजी पराते कम्पाउंड परिसरातील विशिष्ट बांधकाम पाडण्यावरून आरोपींमध्ये वाद झाला होता.