बाळासाहेबांनाही भारतरत्न द्या- मनोहर जोशी

bala
मुंबई – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्याचा निर्णय अतिशय योग्य असून गरीबांसाठी मोठे काम उभे केलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले जावे अशी मागणी सेनेचे जुने जाणते नेते मनोहर जोशी यांनी केली आहे. जोशी म्हणाले की देशाच्या विविध राज्यातून उल्लेखनीय कार्य केलेल्या नेत्यांना भारतरत्न दिले जावे अशी मागणी सातत्याने होत असते मग बाळासाहेबांना हा सन्मान मिळावा ही मागणी अगदी योग्य आहे.

जोशी पुढे म्हणाले की आमच्या मागणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच विचार करतील अशी आमची खात्री आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्ही कडे भाजप सेना एकत्र आहेत. अटलजींचे कार्य महान आहे तसेच बाळासाहेबांचे कार्यही अनमोल आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला जावा अशी सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे.

मनोहर जोशी यांच्या या विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न दिले जावे यासाठीची यादी खूप मोठी आहे असे सांगितले. त्याचवेळी बाळासाहेबांचे काम खरोखरच खूप मोठे आहे अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Leave a Comment