सुरेश प्रभूंची कोंकणवासियांना खुशखबर

suresh-prabhu
पणजी – मुंबई आणि गोव्यातील नागरिकांना केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी एक खुशखबर दिली असून मुंबई-गोवा दरम्यान येत्या काही दिवसातच विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचे प्रभु यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्र आणि गोवा सरकार मिळवून ही विशेष गाडी चालवतील रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. मुंबई आणि गोवा या दोन ठिकाणांमधील पर्यटन अधिक वाढावे यासाठी ही गाडी चालवण्यात येईल असे प्रभु यांनी कोकण रेल्वेतून प्रवास करताना पत्रकारांना सांगितले.

ही विशेष गाडी कोकण रेल्वे मार्गावरून आयसीआरटीसीच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहे. यासाठी लवकरच दोन्ही राज्य सरकारांशी करार करण्यात येणार आहे. ही रेल्वे ३१ तारखेच्या आधी सुरु करण्यात येईल असे प्रभु यांनी स्पष्ट केले.

मुंबई-गोवा प्रमाणेच देशाभरात शिख, बैद्ध, आणि सुफी पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील विशेष गाड्या सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment