मराठवाड्याचे हजारो कोटी पश्चिम महाराष्ट्राने ढापले

devendra-fadnvis
नागपूर – विदर्भच नव्हे, तर मराठवाड्याच्या वाट्याला आलेल्या योजना व योजनेतर निधीतील तब्बल ६९९५.८३ कोटी रुपये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या सत्ताकाळात अवघ्या तीन वर्षांतच पळवल्याने हजारो कोटींच्या विकास निधीची लूट झाल्याचे अर्थ आणि नियोजन विभागाने केळकर समितीकडे सादर केलेल्या खर्चाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी संगनमताने मराठवाड्याच्या हक्काचा हा निधी पळवल्यानंतर त्याबाबतची माहिती देण्यासही हेतुत: टाळाटाळ करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च विधानसभेत विदर्भावरील चर्चेला उत्तर देताना या लुटीचा खुलासा केला होता. मागील सत्ताधा-यांनी विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यावरदेखील अन्याय केल्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी केवळ विदर्भाच्या वाट्याच्या पळवलेल्या निधीची आकडेवारी जाहीर केली होती.

अर्थ तसेच नियोजन विभागाने केळकर समितीला सादर केलेल्या योजनांतर्गत तसेच योजनेतर (नॉन प्लॅन) खर्चाच्या दस्तऐवजांमध्ये मराठवाड्याच्या हक्काच्या निधीची पश्चिम महाराष्ट्राने केलेली हडेलहप्पी उघडकीस आली आहे.या पळवापळवीचा खुलासा झाला आहे.

Leave a Comment