नवी मुंबई : खारघर येथील राहत्या घरी राज्य बाल हक्क आयोगाच्या माजी अध्यक्षा मिनाक्षी जयस्वाल यांची हत्या करण्यात आली असून त्यांच्या घरातून सोने-चांदीचे दागिने आणि इतर किंमती वस्तू गायब झाल्याने जयस्वाल यांची हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होतो आहे.
रात्री १२ वाजताच्या सुमारास मिनाक्षी जयस्वाल या घरात एकट्या असतानाच धारदार शस्त्राने त्यांची हत्या करण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही. पण, घरातील दागिने आणि इतर वस्तूही चोरीला गेल्याने जयस्वाल यांची हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.
राज्य बाल हक्क आयोगाच्या मिनाक्षी जसस्वाल या अध्यक्ष होत्या. बालकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मिनाक्षी जयस्वाल यांच्या अशा अवेळी जाण्याने हळहळ व्यक्त केली जाते आहे.