ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन कसोटीवरही आपले वर्चस्व गाजवत भारतावर दणदणीत विजय साजरा केला. भारताने विजयासाठी दिलेल्या १२८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहा गड्यांच्या मोबदल्यात पार केले. ऑस्ट्रेलियाने या विजयासह चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली आहे. याआधी भारताचा दुसरा डाव अवघ्या २२४ धावांवर आटोपला.
टीम इंडियाच्या फलंदाजांनी मिचेल जॉन्सनच्या भेदक माऱ्यासमोर अक्षरक्ष: नांगी टाकल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले त्यानंतर चौथ्या दिवशीही केवळ ११ धावांत भारताचे ४ फलंदाज माघारी परतले. भारतासाठी सलामीवीर शिखर धवनने १४५ चेंडूत ८१ धावांची खेळी केली.