भुयारी रिंगरोडने मुंबईला जोडणार – नितीन गडकरी

nitin-gadkari
मुंबईः केंद्र सरकारने आता मुंबईला भुयारी मार्गाने जोडण्याची महत्वाकांक्षी योजना आखली असून माहिमच्या खाडीपासून बांद्रा-वरळी सीलिंक आणि त्यापुढे नरीमन पॉईंट ही सर्व ठिकाणी भुयारी रिंग रोडच्या साहाय्याने जोडण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचे नितीन गडकरींनी म्हटले आहे.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी मुंबईमध्ये इंडियन इन्टिट्यूट ऑफ ब्रिज इंजिनीअर्सच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात बोलत होते. बाहेरच्या देशात आपण अशा प्रकारचे रस्ते पाहिले असून त्याची अंमलबजावणी मुंबईत करण्याचा विचार सुरु असल्याचे गडकरी म्हणाले.

तब्बल ९० हजार कोटींचा खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित असून तो खर्च ६० हजार कोटींपर्यंत आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही यावेळी गडकरींनी नमूद केल्यामुळे वेगवान म्हणून गणली जाणारी मुंबई आणखी वेगवान होण्याची चिन्ह आहेत. केंद्राचा हा विचार प्रत्यक्षात उतरला तर मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment