नव्या वर्षात रेल्वे भाडेवाढीचा दणका?

railway
नवी दिल्ली- देशातील जनतेच्या पदरात महागाईचा मोठा बोजा टाकण्याची तयारी सुरू झाली असून रेल्वे खात्याकडून इंधन दरात वाढ झाल्याचे कारण देऊन प्रवाशांवर भाढेवाढ लादण्याची तयारी सुरू झाली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांच्या खिशात पुन्हा हात घालण्यात येणार आहे.

रेल्वेने इंधनावर आधारित भाडे ठरवण्याचे धोरण ठरवले असून यानुसार प्रवासी आणि माल वाहतुकीच्या भाडय़ाची सुधारणा करण्यात येते. जून २०१४ मध्ये प्रवासी वाहतुकीत ४.२ टक्के तर मालवाहतुकीत १.४ टक्के भाडेवाढ झाली होती. आता डिसेंबरमध्ये भाडय़ाची फेररचना होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यात इंधनाच्या दरांमध्ये ४ टक्के वाढ झाल्यामुळे रेल्वे भाडेवाढ होणे गरजेचे आहे, असे रेल्वे खात्याच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही नुकत्याच एका कार्यक्रमात रेल्वे भाडेवाढीचे संकेत दिले होते. प्रवाशांना या भाडेवाढीचा काही भार स्वीकारावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

रेल्वेचा खर्च वाढत आहे. रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा हव्या असल्यास त्यांना अधिक भाडे द्यावे लागेल. आपण सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. रेल्वेत मोठी गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांना त्याचा भार सोसावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment