उत्तर महाराष्ट्राला गारपिटीने, तर कोकणाला अवकाळी पावसाने झोडपले

rain
नाशिक/रत्नागिरी – सलग दुस-या दिवशीही नाशिकसह धुळे जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसल्यामुळे डाळिंब आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे कोकणात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकर्यांाचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, मालेगाव, चांदवड, बागलाण, देवळा व येवला या सात तालुक्यातील अनेक गावांना गुरुवारी सायंकाळी बेमोसमी पावसासह गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसल्यामुळे रब्बी पिकांबरोबरच कांदा आणि द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. आज (शुक्रवारी) दुसर्याा दिवशीही गारपिटचा तडाखा बसला आहे.

दुष्काळाने पोळणा-या विदर्भ आणि मराठवाड्यात पाण्याअभावी पिके वाया गेली आहेत. उत्तर महाराष्ट्रात गारपिटीमुळे तर कोकणात मुसळधार पावसाने शेतकर्यां चे मोठे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेल्या पीक गमवण्याची वेळ शेतकर्यांुवर आली आहे.

Leave a Comment