अधिवेशन संपेपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड निलंबित

jitendra
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान गोंधळ केल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी ही कारवाई जितेंद्र आव्हाड यांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातल्याने केली आहे.

मुख्यमंत्री विधानसभेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजबाबत उत्तर देत होते, मात्र त्यावेळीच जितेंद्र आव्हाड यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले.

दरम्यान आव्हाडांच्या निलंबनाच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांनी सभात्याग केला. तसेच आज सभागृहात होणाऱ्या कामकाजात दोन्हीही पक्षाचे आमदार सहभागी होणार नाहीत.

Leave a Comment