सरकार फेडणार पाच लाख शेतकऱ्यांचे कर्ज : मुख्यमंत्री

devendra
नागपूर : राज्य सरकारने खासगी सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला असून पीक कर्जाचे व्याजही सरकार भरणार आहे. राज्यभरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

सध्या राज्यात पाच लाख शेतकरी सावकारी कर्जपाशात असून त्यांचे कर्ज सरकार फेडणार आहे आणि पीक कर्जाचे व्याजही सरकार भरणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यांतील शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीज बिलही माफ करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ३९२५ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. दरम्यान, राज्यातील दुष्काळ मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पोहोचल्यामुळे १४ आणि १५ डिसेंबरला केंद्रीय पथक दुष्काळाच्या पाहणीसाठी राज्यात येणार आहे.

Leave a Comment