विश्वचषकासाठी संभाव्य संघाची आज निवड

world-cup
मुंबई : भारताच्या संभाव्य संघाची ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये २०१५मध्ये होत असलेल्या क्रिकेट विश्वचषकासाठी निवड आज मुंबईत होणार असून २०१५च्या विश्वचषकासाठी नव्या खेळाडूंना निवड समिती संधी देऊ शकते.

आज दुपारी १ वाजता मुंबईत संदीप पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पाच सदस्यीय निवड समितीची बैठक होणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी दिली.

अंतिम संघाची घोषणा निवड समिती ७ जानेवारी रोजी करणार असून १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या काळात होणाऱ्या विश्वचषकात हा संघ खेळेल.

Leave a Comment