भारताचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय

hocky
भुवनेश्वर – भारताने गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर २-० ने दमदार विजय मिळवला.दोन्ही संघानी सामन्याच्या पहिल्या आणि दुस-या सत्रात गोल करण्याचे खूप प्रयत्न केले मात्र कोणत्याही संघाला त्यात यश मिळाले नाही. भारताच्या गुरजिंदर सिंग आणि एस.व्ही.सुनिल यांनी तिस-या सत्रात मिळालेल्या संधीचा फायदा घेत गोल केले आणि भारताला विजयी आघाडी मिळवून दिली.

उपकर्णधार पी.आर.श्रीजेशनेही भारताच्या या कामगिरीवर आनंद व्यक्त केला असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा आमचा शेवटचा सराव सामना होता आणि आता आम्ही आगामी स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहोत. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर आमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला असल्याचे श्रीजेश म्हणाला.भुवनेश्वर येथे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सहा डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे.

Leave a Comment