बालसुधारगृहातील पाच मुले पळाली

juvenile
पुणे – काल रात्री उशिरा पुण्यातील जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहातील पाच मुलांनी पळ काढला आहे. या सुधारगृहाची संरक्षक भिंतीची उंची अतिशय कमी असल्याने मुलांना पळ काढणे सोपे असल्यामुळे तात्काळ या भिंतीची उंची वाढवावी, अशी अपेक्षा येथील अधिक्षकांनी व्यक्त केली आहे.

मुले पळून जाण्याची ही गेल्या तीन महिन्यात दुसरी घटना असून पळालेल्या या पाच मुलांपैकी दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल असून अल्पवयीन असल्याने त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आले होते.

Leave a Comment