शहिदांच्या कुटुंबीयांना विशेष सवलतीसाठी लवकरच सरकारी धोरण – मुख्यमंत्री

fadnvis
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासन लवकरच विविध शौर्यपदकप्राप्त शहिदांच्या कुटुंबीयांना विशेष सवलती देण्यासाठी धोरण तयार करणार आहे, अशी माहिती दिली.

त्याचबरोबर हे धोरण ठरविताना इतर राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करावा आणि तसा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली.

विविध शौर्यपदक मिळालेल्या शहिदांच्या कुटुंबीयांना अन्य राज्यांमध्ये विशेष सवलती दिल्या जातात. अशाप्रकारे महाराष्ट्रातही या सवलती मिळाव्या, अशी मागणी शहिदांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, नियमाप्रमाणे ज्या सवलती लागू आहेत, त्याव्यतिरिक्त विविध शौर्यपदक विजेत्या शहिदांच्या कुटुंबीयांना अन्य राज्यांमध्ये यासंदर्भात जे धोरण आहे, त्याचा अभ्यास करून महाराष्ट्राचे धोरण ठरविण्यात येईल.

Leave a Comment