तीन विवाहिता पुण्यातून बेपत्ता

kidnapped
पुणे – तीन विवाहित महिला आपल्या मैत्रिणीला दवाखान्यात घेऊन जाण्याच्या निमित्ताने बाहेर तीन दिवस उलटले तरी ते बेपत्ता आहेत आणि त्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

हिंजवडीतील आयटी कंपनीत बेपत्ता महिलांपैकी दोन महिला सुरक्षारक्षक म्हणून कामाला असून चालक गाडी थांबवत नसल्याचा शेवटच्या संशयास्पद फोनमुळे त्यांचे अपहरण झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केल्या यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतिभा प्रकाश हजारे, मंगला सिद्धार्थ इंगळे, विद्या दशरथ खाडे अशी बेपत्ता महिलांची नावे आहेत. या प्रकरणी प्रतिभा हजारे यांचे पती प्रकाश बाबू हजारे यांनी हिंजवडी पोलिसांत तक्रार दिली होती.

Leave a Comment