पुढे ढकलला पहिला कसोटी सामना

cricket
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणारा पहिला कसोटी सामना फिल ह्युजच्या अकाली निधनामुळे पुढे ढकलण्यात आला असून आता हा सामना ४ डिसेंबरला ऐवजी १२ डिसेंबर ते २६ डिसेंबरच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे.

क्रिकेट जगतावर फिल ह्युजच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली असून 3 डिसेंबर रोजी ह्युजच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र पुढची तारीख अद्याप सांगण्यात आली नाही.

Leave a Comment