रद्द होऊ शकतो पहिला कसोटी सामना

cricket
सिडनी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलीप ह्युजच्या निधनामुळे क्रिकेटपटूंना धक्का बसला असून, क्रिकेटपटू सध्या दु:खात असल्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणा-या पहिल्या कसोटी सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिला कसोटीसामना चार डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार होण्याबद्दल साशंकता आहे. याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख अधिकारी जेम्स सदरलॅण्ड म्हणाले की, क्रिकेटपटू सध्या दु:खात असून त्यांना या स्थितीतून सावरण्यासाठी वेळ दिला पाहिजे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी त्यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तीला गमावले आहे.

Leave a Comment