नाथाभाऊ अडचणीत येण्याची शक्यता

eknath
जालना : शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे खडसे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यामुळे खडसे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. जाफराबाद पोलीस स्टेशनमध्ये खडसेंविरोधात काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे. खडसेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला, असे या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

सत्तेत येण्याआधी शेतकऱ्यांना वीजबिले माफ करा, अशी ओरड करणाऱ्या एकनाथ खडसे यांची भाषा सत्तेत आल्यावर बदलली. मोबाईल फोनची बिले भरायला पैसे आहेत, मग वीजबिले का भरता येत नाहीत, असा बोचरा सवाल करत महसूल मंत्री खडसेंनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले.

Leave a Comment