खडसे यांनी शेतक-यांच्या जखमेवर चोळले मीठ

khadse
अकोला : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शेतक-यांना मोबाईल फोनची बिले भरायला पैसे येतात, मग वीज बिले पैसे येत नाहीत का?, असा सवाल करून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सत्ता काबीज करण्यापूर्वी वीजबिल माफीची मागणी करणा-या खडसेंची भाषा सत्तेवर आल्यानंतर कशी काय बदलली, असा संतप्त सवाल शेतक-यांकडून विचारला जात आहे.

खडसे यांनी हे विधान अकोला येथे आयोजित पत्रकार परिषेदत वीजबिलाबाबत केले. वीजबिलात सवलत देऊ. मात्र, ते माफ करणार नाही, असे सांगत कनेक्शन तुटण्याच्या भीतीने मोबाईलचे बिल भरण्यासाठी पैसे असतात, तर वीजबिल भरायला नसतात काय, असा सवालही खडसे यांनी शेतकऱयांना विचारला. त्यामुळे शेतकऱयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Leave a Comment