… तर तीन दिवस कामबंद

sharad-rav
मुंबई : कामगार नेते शरद राव यांनी आज राज्यातील साडेचार लाख महापालिका कर्मचारी राज्य सरकारने व्यापा-यांच्या दबावाखाली एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास तीन दिवस कामबंद आंदोलन करतील, असा इशारा राज्य सरकारला दिला.

व्यापा-यांचा सरकारवर एलबीटी रद्द करण्यासाठी दबाव वाढला असून सरकारने एलबीटी व्यापा-यांच्या दबावाखाली रद्द करू नये, अशी मागणी कामगार नेते राव यांनी केली आहे. एलबीटी रद्दचा निर्णय घेतल्यास राज्यातील ४ लाख ५० हजार महापालिका कर्मचारी कामबंद आंदोलन करतील, असा इशाराही राव यांनी दिला आहे. ११ ते १३ असे तीन दिवस कामबंद आंदोलन करण्यात येईल तसेच १० डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून या आंदोलनाला सुरूवात करण्यात येईल, असेही राव यांनी म्हटले आहे.

Leave a Comment