सदाभाऊंनी डागली भाजप सरकारवर तोफ

khot
नगर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मित्रपक्ष भाजपावर ‘मोठया चोराला छाताडावरून बाजूला करून छोटया चोराला बसविल्यामुळे शेतक-याच्या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही’, असे सांगत भाजपाचे सरकारही चोरच असल्याची जळजळीत टीका श्रीरामपूरात आयोजित ऊस आणि दूध परिषदेत केली आहे. येत्या २५ तारखेपर्यंत ऊसदराबाबत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू, असा गर्भीत इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी या वेळी दिला.

आज दुष्काळाने निम्मा महाराष्ट्र होरपळतो आहे. शेतक-याला काय हवे आहे ? काय मदत द्यायची ती नंतर द्या, मात्र, त्याआधी दुष्काळी पट्टयातील शेतक-यांचे कर्ज आणि वीज बील माफ करा, अशी मागणीही सदाभाऊंनी या वेळी केली. शरद पवार शेतक-यांविषयी कळवळा व्यक्त करतात. मात्र, शेतक-यांवर अन्याय करणा-या त्यांच्याच पक्षाच्या विजयसिंह मोहिते-पाटील या ज्येष्ठ खासदारवर का कारवाई करीत नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

Leave a Comment