राष्ट्रवादीने घोडचूक केली – जयंत पाटील

jayant-patil
अलिबाग – मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते चिंतन शिबिरात बोलू लागले असून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपला पाठिंबा देणे ही राष्ट्रवादीची घोडचूक असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे दोन दिवसीय चिंतन शिबीर अलिबागमध्ये सुरु असून या शिबीरातील अंतर्गत बैठकीत जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. निवडणूक निकाल लागताच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. पण राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याबाबत कोणतेच जाहीर वक्तव्य भाजपने केले नाही.

कालच्या भाषणात पवारांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यात भाजपला काय अडचण हेच कळत नाही, तसेच सरकारमध्ये धाडस नसल्याने भाजप सरकार अल्पजीवी ठरेल, असा सूचक इशाराही दिला होता. त्यामुळे बिनशर्त आणि स्थिर सरकारसाठी पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांची भाषा आता कमालीची बदलील आहे. भाजपची कोंडी करुन राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास भाग पाडणे हेच शरद पवारांसारख्या दमदार राजकारण्याचे ध्येय असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment