अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश

kidnapped
मुंबई – राज्य शासनाने पोलिसांना चौदा वर्षांखालील हरवलेल्या मुलांची नोंदवहीत नोंद न करता थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाची आता हरवलेल्या मुलांच्या पालकांकडून तक्रार आल्यानंतर अमंलबजावणी होणार आहे.

राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक आणि पोलीस ठाण्यांना हरवलेल्या मुलांचे गुन्हे तातडीने नोंदवून घेण्यात यावेत असे आदेश देण्यात आले आहेत. याचसोबत चार महिन्यांच्या आत हरवलेल्या मुलांचा तपास न लागल्यास मानवी वाहतूक प्रतिबंधक खात्याकडे तपास सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Comment