हवाई हल्ल्यात मारला गेला वाघा बॉर्डर बॉम्बस्फोटाचा सूत्रधार

pakistan
इस्लामाबाद – पाकिस्तानी सैन्याने असा दावा केला आहे की त्यांच्या वायूसेनेने खैबर प्रांतातील दारास भागात हल्ला करून १३ अतिरेक्यांना यमसदनी धाडले आहे. या हल्ल्यात काही दिवसांपूर्वी वाघा बॉर्डरवर झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार देखील मारला गेल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानी सैन्याला वाघा बॉर्डरवर झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार या भागात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अतिरेक्यांच्या तीन ठिकाणांवर हवाई दलाने केलेल्या कारवाईत हे १३ अतिरेकी मारले गेले आहेत. हा भाग अल कायदा आणि तहरीक-ए-तालिबान या अतिरेकी संघटनेचा महत्वाचा भाग म्हणून मानला जातो.

Leave a Comment