१०० पेक्षा जास्त लोकांना जेवणातून विषबाधा

food
कल्याण : खोणी गावात शंभरहून अधिक गावकऱ्यांना तेराव्याच्या जेवणाच्यावेळी दुधीहलवा खाल्ल्याने विषबाधा झाली. या गावकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खोणी गावातील बाळाराम मारुती म्हात्रे यांचे निधन झाल्यामुळे तेरावे होते. या निमित्ताने जेवणामध्ये गोड म्हणून म्हात्रे यांच्या नातेवाईकांनी दुधी हलव्याची ऑर्डर दिली होती. कल्याण येथील स्वागत स्वीट मार्ट या दुकानदाराला २०० किलो दुधी हलव्याची ही ऑर्डर होती. दुकानदाराने ८०० बॉक्समध्ये ही ऑर्डर दिली. जेवण केल्यानंतर दोन ते तीन तासानंतर अनेकांना उलटी ,जुलाब आणि मळमळ याचा त्रास होऊ लागला.

गावात सर्वांना हा विष बाधेचा प्रकार असल्याच समजले. लागलीच ज्यांना त्रास होत होता त्याना महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात, निलजे येथील एमजीएम हॉस्पिटल आणि अनेक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकाराबाबत स्वागत स्वीट मार्ट या दुकान मालकावर कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment