फेसबुकने हटवल्या भारतातील पाच हजार लिंक्स

facebook
नवी दिल्ली – फेसबुकने भारतातील जवळ जवळ पाच हजार माहितीच्या लिंक्स हटवल्या असून सरकार आणि अन्य संस्थांकडून आलेल्या विनंतीवरून फेसबुकने ही माहिती हटवली आहे. सोशल मीडियावर सामाजिक तेढ अथवा व्यक्त आणि समूहाची बदनामी निर्माण करणारी माहिती हटवण्यासंदर्भात केलेल्या विनंतीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे फेसबुकने आपल्या वेबसाइटवरील ज्या लिंक्स हटवल्या आहेत. त्यामध्ये भारतातील लिंक्सचे प्रमाण जगातील अन्य कोणताही देशापेक्षा सर्वात जास्त आहे.

भारतासह फेसबुकने तुर्कस्तानातून अपलोड झालेल्या एक हजार ८९३ लिंक्स आणि पाकिस्तानमधून अपलोड झालेल्या एक हजार ७७३ लिंक्स तेथील सरकारच्या विनंतीवरून हटवल्या आहेत.

Leave a Comment