वसंत गीते यांनी दिला सरचिटणीसपदाचा राजीनामा

geete
मुंबई – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर निराश झाले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मनसेत सध्या राजीनामा सत्र सुरु झाल्याचे चित्र आहे.

मनसेचे माजी आमदार वसंत गीते यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या बरोबरच मनसेचे नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरेंनीही आपले पद सोडले आहे.

राज ठाकरे विधानसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर राज्यव्यापी दौऱ्यावर असून त्याच पार्श्वभूमीवर हे राजीनामे देण्यात आले आहेत. ३ ते ४ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये मनसेची चांगली पकड होती. मात्र लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही नाशिकमध्ये मनसेची जोरदार पिछेहाट झाल्यामुळेच नाशिकसह राज्यात पक्षाची नव्याने पुनर्बांधणी आवश्यक असल्याच्या पार्श्वभूमीवर हे राजीनामे दिल्याचे सूत्रांकडून समजत आहे.

Leave a Comment