मोदींनी किल्ले संवर्धनासाठी निधी द्यावा – संभाजीराजेंची मागणी

raje
अहमदनगर – महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने केली. त्यानंतर मोदींना आपल्या सर्व जाहिरातीवर महाराजांच्या फोटोचा पुरेपूर वापरू करून घेतला. त्यामुळे आता राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने निधीची पुतर्ता करावी, अशी मागणी कोल्हापूर करवीर संस्थानचे श्रीमंत युवराज संभाजीराजे यांनी केली आहे. मुळात राजकारण्यांना किल्ले संवर्धनाचे काही देणे-घेणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अनेक पक्ष राजकीय हितासाठी वापर करीत आहेत. मात्र, महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी पार पाडली जात नाही’, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मोदींनी पुढाकार घेऊन महाराजांच्या प्रेमापोटी त्यांच्या किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment