
मुंबई – मतदानानंतर आलेल्या पाहणी अहवालातून भाजपला बहुमतासाठी गरज लागल्यास शिवसेना समर्थन देणार नाही. शिवसेनेच्या नेत्यांची याबाबत दोन मतांतरे आहेत. एक्झिट पोलमधून भाजपचा उत्साह वाढला असला तरी ते वेगळ्या चिंतेत देखील आहेत. ते केवळ सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून उत्साहात असले तरी सत्तेपासून दूरच आहेत. भाजपची केंद्रीय प्रचार यंत्रणा देखील कामाला लागल्यानंतर पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाहीतर ते शिवसेनेकडे मदत मागतील. अशावेळी भाजपला मदत करायची की नाही यावर `मातोश्री’ अद्याप ठाम नाही. भाजपला सोडून जायचे ठरवले तर ते मनसेची मदत घेतील ही `मातोश्री’ची प्रमुख चिंता आहे. भाजपच्या सरकारमध्ये सामील झाले तर भाजपच्या जागा जास्त असल्याने कमी महत्वाची खाती घ्यावी लागतील आणि नव्या युतीमुळे निर्माण झालेल्या कटुतेचा त्यावर प्रभाव असेल. उद्धव ठाकरे यांना मात्र भाजप सरकारमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे असे सूत्रांनी सांगितले. कारण कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेसोबत जाण्याचा मतदारांवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. शिवसेनेच्या अनेक नेत्यांना झाले गेले विसरून पुन्हा भाजपसोबत जाण्याची आस आहे कारण तेथे सुरक्षित सत्तेमध्ये राहता येणार आहे. राजकारणात काहीही घडू शकते. भाजपच्या नेतृत्वात सरकारमध्ये असणे आणि कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकारमध्ये असणे यामध्ये नक्कीच फरक आहे असे सेनेचे नेते मानतात. मुख्यमंत्री पदाचा निर्णय भाजपला घेताना सेनेला भूमिका बजावता येईल. तर सेनेने मागील सारे विसरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर असे हा नेता म्हणाला. भाजपला बहुमत मिळाले तर सेनेची गरजच उरणार नाही आणि अशा वेळी शिवसेनेला महत्वाचा राजकीय निर्णय घ्यावा लागेल असे सेनेचे नेते सांगतात.
