राज्यपालांच्या हस्ते स्वच्छता अभियानाची सुरुवात

vidyasagar
मुंबई – राज्यपाल के विद्यासागर राव यांनी आज मंत्रालय येथे स्वत:साफसफाई करुन स्वच्छ भारत अभियानाची औपचारिक सुरुवात केली. राज्यपालांचे सल्लागार अनिल बैजल, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे तसेच मंत्रालयातील अनेक अधिका-यांनी देखील यावेळी हाती झाडू घेऊन स्वच्छता केली. राज्यपालांनी पत्नी विनोदा यांसह राजभवन येथे स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. राज्यात स्वच्छता अभियानाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने अप्पासाहेब धर्माधिकारी, अभिषेक बच्चन, राजश्री बिर्ला, निता अंबानी, अंजली भागवत, मोमिका मोरे, सुनिधी चव्हाण, मकरंद अनासपूरे आणि तषार गांधी या नऊ जणांना राज्यपालांनी मानद स्वच्छता दूत म्हणून जाहिर केले.

Leave a Comment