सीमावादात अडकलेल्या मतदारांना करता येते दोनदा मतदान

vote1
मुंबई : प्रत्येक नागरिकाला केवळ एका मताचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला असला तरी महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरची काही गावे अशी आहेत, की जी दोन्ही राज्यात मतदान करतात.

सीमावादात अडकलेल्या या साडेबारा गावांमधल्या ३००० नागरिकांकडे दोन्ही राज्यांची मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्डही आहेत. हे नागरिक आज महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान करणार करणार आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी मतदान असेल, तरी त्यांचे अडत नाही.

महत्त्वाचे म्हणजे, पहिल्यांदा तेलंगणात मतदान केल्यानंतर महाराष्ट्रात त्यांना दुसऱ्यांदा मत द्यायला परवानगी दिली जात नाही. परंतु, याउलट महाराष्ट्रात मतदान केल्यानंतर मधल्या बोटावर शाई लावून दुसऱ्यांदा तेलंगणामध्ये मतदान करायचे असेल तर त्यांना करता येते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गावकऱ्यांनी असे दोनदा मतदान केले आहे.

Leave a Comment