भारत-पाकिस्तानमधील शत्रुत्वाचे मुळ कारण काश्मीर मुद्दाच – बिलावल भूट्टो

bilawal
लाहोर – भारत-पाकिस्तान मध्ये असलेल्या शत्रुत्वाचे मुळ कारण काश्मीर मुद्दा असल्याचे पाकिस्तान पीपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भूट्टो जरदारी यांनी म्हटले आहे. उपमहाद्वीपातही शत्रुत्वाचे कारण काश्मीर मुद्दाच आहे. रसूखदार भुट्टो कुटुंबाचे वारस बिलावल यांनी एका अधिवेशनात असे वक्तव्य केले. काश्मीर राज्य सरकाने आपल्या निर्दयी कामकाजावर लक्ष केंद्रीत करावे अशी मागणी त्यांचा पक्ष करत असून या समस्येचे निवारण केल्यानेच दोन्ही देशांत शांतीचे वातावरण निर्माण होऊ शकेल असे वक्यव्य त्यांनी केले. काहीदिवसांपूर्वी बिलावल यांनी असे म्हटले होते. की, काश्मीर हा पाकिस्तानच्या क्षेत्रफळत येत असल्याने त्यांचा पीपल्स पक्ष भारताकडून तो मिळवूनच राहणार. ९ सप्टेंबर रोजी पंजाबमधील मुल्तान येथे झालेल्या अधिवेशनात त्यांनी असे वक्तव्य केले होते की, संपूर्ण काश्मीर हे पाकिस्तानाचे आहे आणि तो ते मिळवूनच राहतील.

Leave a Comment