विकासात्मक मुद्यांवर निवडणूका लढवण्याचा काळ – उमा भारती

uma-bharti
औरंगाबाद – भारतीय जनता पक्ष अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा विसरलेली नाही. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर निवडणूका लढविण्याचा काळ गेला आहे. आता विकासविषयक गोष्टीच महत्वाच्या आहेत. अयोध्येत राम मंदिर बनविण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केलेले आहे, असे भाजप नेत्या व केंद्रीय जलस्त्रोत मंत्री उमा भारती यांनी सांगितले. महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणूकीनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. भारती म्हणाल्या, ‘‘भाजपला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळणे निश्चित आहे. येथील नागरिकांनाही एकाच पक्षाचे सरकार हवे आहे. इतर पक्षातून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपमध्ये सहभागी झाल्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की गंगेला मिळणारी प्रत्येक नदी नंतर पवित्र होते.

Leave a Comment