काश्मीरप्रश्नी मोदींनी घ्यावा जनमताचा कौल – इमरान खान

imran-khan
लाहोर – पाकिस्तानचे अपक्ष नेते आणि ‘तहरीक ए इंसाफ पक्षाचे अध्यक्ष इमरान खान यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मोदी यांनी जनमताचा कौल घ्यावा असे प्रतिपादन केले आहे. एका सभेत बोलताना खान यांनी मोदींना सुचित केले की, मोदी प्रचंड बहूमताने निवडून आले आहेत. त्यासाठी त्यांना जनतेच्या मुद्द्यांचा विचार करावा. क्रिकेटरपासून नेते बनलेले खान म्हणाले की, खंडप्राय देशात खुप गरीबी आहे. युद्ध आणि हत्यारावर संपत्ती खर्च करण्यापेक्षा पाकिस्तान तसेच भारतातील गरीबी संपवण्यासाठी मोदींनी विचार करावा. देशातील शांतता कायम राखता यावी आणि व्यापारात वृद्धी व्हावी म्हणून दोन्ही देशांनी विचार करावा. सीमेरेषेवर भारताकडून झालेल्या गोळीबारात अनेक पाक नागरिक ठार झाले असले तरी नवाब यांनी एकही शब्द न बोलल्याचा आरोप खान यांनी केला. ते म्हणाले पाकिस्तान कोणत्याही हल्ल्याचा सामना करु शकतो.

Leave a Comment