राज ठाकरे टायमिंग साधणारे नेते – सतीश वाळूंज

raj-thackarey
मुंबई – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असलेले सतीश वाळूंज यांनी राज ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी टायमिंग साधून संभ्रम निर्माण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे हे टायमिंग साधणारे नेते आहेत. लोकसभेवेळी त्यांनी वडा आणि सूपचा विषय काढून टायमिंग साधण्याचा प्रयत्न केला होता. आताही तसाच प्रयत्न करत असल्याचा आरोप वाळूंज यांनी केला आहे. बाळासाहेब जेव्हा राज ठाकरेंना फोन करत होते, तेव्हा राज फोन उचलत नव्हते. त्यामुळे त्यांची ही खेळी असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच राज ठाकरेंच्या लोकसभेतल्या भाषणानंतर आपण राज-उद्धव यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न कायमचे थांबवले असल्याचेही वाळूंज यांनी सांगितले.

Leave a Comment