अनिल अंबानी यांनी स्वच्छ भारतसाठी घेतला हातात झाडू

anil-ambani
मुंबई – उद्योगपती अनिल अंबानी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभाग घेतला असून अंबानी यांनी आज पहाटे चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्याची साफसफाई केली.

‘स्वच्छ भारत’ अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केल्यानंतर त्यांनी देशातील नऊ प्रतिष्ठित व्यक्तींना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या सहकार्यांनी या अभियात सहभागी होत मुंबईतल्या रस्त्यांची साफसफाई केली होती. त्यानंतर आज रिलायन्स अद्योग समुहाचे प्रमुख अनिल अंबानी आणि त्यांच्या रनर्स क्लबमधील 50 सहकार्यांनी चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर साफसफाई केली.

या अभियानात सहभागी होण्यासाठी त्यांनी महानायक अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, शोभा डे, प्रसून जोशी, शेखर गुप्ता, सानिया मिर्झा, तेलुगु सुपरस्टार नागार्जुन यांच्या नावांची घोषणा केली.

Leave a Comment