तेरा दिवसांत ४२ लाखांची रोकड जप्त

currency
चंद्रपूर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तैनात केलेल्या भरारी पथकाने तेरा दिवसांत ४२ लाख ८३ हजारांची रोकड जप्त केली. दोन दिवसांपूर्वीच चिमुरात मोठा मद्यसाठादेखील या पथकाने ताब्यात घेतला. या प्रकरणात पाच जणांची पोलिस चौकशी करीत आहे. सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता १२ सप्टेंबर रोजी जाहीर झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर निवडणूक आयोगाने पथक तैनात केले होते. या पथकाने आतापर्यंत चिमूर, खांबाडा, ब्रह्मपुरी, कांतापेठ आणि सरडपार येथील वाहन तपासून ४२ लाखांची रोकड जप्त केली. या पैशाची पोलिस सध्या कसून चौकशी करीत आहे.

Leave a Comment