वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर

team-india
बंगळूरु – भारताच्या १४ सदस्यीय संघाची शनिवारी बंगळूरुमध्ये घोषणा करण्यात आली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या तीन लढतींसाठी अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे. त्यात डावखुरा युवा फिरकीपटू कुलदीप यादवला स्थान मिळाले.

लेगस्पिनर अमित मिश्रा तसेच मुरली विजयचाही संघात समावेश आहे. दुखापतग्रस्त सलामीवीर रोहित शर्माच्या जागी विजयला संधी मिळाली. दरम्यान, इंग्लंड दौ-यावर गेलेला अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीसह मध्यमगती धवल कुलकर्णी, राखीव यष्टिरक्षक संजू सॅमसन तसेच लेगस्पिनर करन शर्मालाही स्थान देण्यात आलेले नाही.

दरम्यान, चँपियन्स लीग टी-२० मध्ये गोलंदाजीची शैली आक्षेपार्ह असल्याचा आरोप झालेला ऑफस्पिनर सुनील नारायणचा भारत दौ-यात समावेश न करण्याचा निर्णय वेस्ट इंडिज संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.

भारताचा संघ (पहिल्या तीन वनडेसाठी) : महेंद्रसिंग ढोणी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, अंबाती रायडू, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, मोहित शर्मा, उमेश यादव, मुरली विजय, कुलदीप यादव.

Leave a Comment