आशियाई स्पर्धेतील कामगिरी बद्ल राज्यातील खेळाडूंचे राज्यपालांकडून अभिनंदन !

vidyasagar-rao
मुंबई – दक्षिण कोरियातील इंचियॉन येथे नुकत्याच संपन्न झालेल्या १७ व्या आशियाई खेळात विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी अभिनंदन केले आहे.राज्यपाल विद्यासागर राव यांनी अभिनंदन करताना सांगितले की, इंचियॉन येथे झालेल्या आशियाई खेळात भारतासाठी विविध पदके मिळविणा-या सर्व खेळाडूंचे मी हार्दिक अभिंनदन करतो. महाराष्ट्रातील खेळाडूंची या स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय होती. राज्यातील खेळाडूंच्या कर्तृत्वाचा आलेख सातत्याने उंचावत राहील, अशी अपेक्षा करतो आणि सर्व खेळाडूंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Leave a Comment