इंचिऑन: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करीत सुवर्णपदक मिळविल्यामुळे भारताचे रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश ही नक्की झाला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधला हा सामना निर्धारित वेळेत १-१ असा बरोबरीत सुटला होता. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने पाकिस्तानवर ४-२ अशी मात केली.
भारताने तब्बल सोळा वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असून याआधी १९९८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदकाची कमाई केली होती.