राजकीय घडामोडीमागे पवारांचा हात : राज ठाकरे

raj
यवतमाळ : युती आणि आघाडी तुटण्यामागे शरद पवारांचाच हात असल्याचा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रचार सभे दरम्यान केला. सणासुदीच्या आणि ऑक्टोबर ‘हिट’मध्येच निवडणूका घेण्याची गरज होती का, असे म्हणत ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.

यवतमाळ जिल्हयातील मनसे उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी वणी येथे आज (बुधवार) राज ठाकरे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ठाकरे यांनी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यकर्त्यांचे पाप हसण्यावारी नेण्यापेक्षा पेटून उठण्याचे आवाहन ठाकरे यांनी जनतेला केले. सत्ता आल्यास परप्रांतिय तरूणांना पोसणाऱया खासगी सुरक्षा रक्षक एजन्सी बंद करून महाराष्ट्र शासनाची सुरक्षा रक्षक एजन्सी स्थापन करण्यात येईल. त्यात फक्त महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांनाच नोकऱया देण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

Leave a Comment