२९ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या ताब्यात

fisherman
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या हद्दीतील समुद्रात प्रवेश केल्याच्या कारणावरून २९ भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानच्या हद्दीत १० किलोमीटर आत आल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे एका वृत्तवाहिनीच्या वृत्तात म्हटले आहे.

’मेरिटाइम सेक्युरिटी एजन्सी’च्या अधिकार्‍यांनी या मच्छीमारांना अटक केली असून त्यांच्या पाच बोटीही जप्त करण्यात आल्या आहेत. मे २०१४ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ भारताच्या दौर्‍यावर आले असताना पाकिस्तानने १५१ मच्छीमारांची सुटका करण्यात आली होती.

Leave a Comment