सचिव स्तरीय बैठक पाकिस्तानमुळेच रद्द – सुषमा स्वराज

sushma-swaraj
न्यूयॉर्क – भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्लामाबादमध्ये होणारी भारत आणि पाकिस्तानदरम्यानची सचिव स्तरीय बैठक पाकिस्तानमुळेच रद्द झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले. फुटीरतावादी नेत्यांना पाकिस्तानने चर्चेसाठी आमंत्रण दिल्याने ही चर्चा रद्द करण्यात आली होती.

संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिवेशन सध्या न्यूयॉर्क येथे सुरु आहे. यावेळी परराष्ट्रमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी भारतीय पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पाकिस्तानमुळेच ही चर्चा होऊ शकली नाही, असे स्वराज्य यांनी सांगितले.

याआधी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र सल्लागार सरताज अझिझ यांनी २५ ऑगस्टला होणारी चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली. आता या चर्चेसाठी भारताने पुढाकार घेतला तरच दोन्ही देशांदरम्यान पुन्हा चर्चा होऊ शकते असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर स्वराज यांनी हे प्रत्युत्तर दिले.

Leave a Comment